आता पुन्हा एकदा भाजपला लोकांनी नाकारले आहे – नवाब मलिक

 

मुंबई | राज्यातील विविध नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाटेल चांगलेच यश मिळाले. त्यातच आघाडीला ८० टक्के जागा मिळाल्या आहेत, याचा अर्थ भाजपला जनतेने नाकारले आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. राज्यातील नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून यावरून नवाब मलिक यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत जनतेचा कल राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याबाजूने दिसत आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढली आहे तर काही ठिकाणी शिवसेनेबरोबर तर काही ठिकाणी तिन्ही पक्ष स्वबळावर लढले आहेत, असे असताना मतांचे विभाजन होऊनही जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात आपला कौल टाकला आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

राष्ट्रवादीतील नवीन नेते रोहित पवार, सुनील शेळके, रोहित पाटील यांनी दोन तीन वर्ष आपल्या मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला, त्यामुळे त्यांना यश मिळाले असे विधान सुद्धा नवल मलिक यांनी केले आहे. आज जाहीर झालेल्या पंचायतीच्या निवडणुकीकडे विधानसभेची सेमीफायनल म्हणून बघितले जात यात आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.

Team Global News Marathi: