१९ मार्च हा जागतिक निद्रा दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. शेतकरी आंदोलन, बेरोजगारी आदी विषयांवरून त्यांनी केंद्रावर टीका करताना मोदी सरकारची तुलना कुंभकर्णाशी केली होती.
मंत्री जयंत पाटील यांनी काल मोदी सरकारलवर जोरदार निशाणा साधला होता ‘शेतकरी आंदोलनात जवळपास ३०० च्या वर शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत, दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. मात्र, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’ अशी टीका केली होती. या टीकेला अतुल भातखालकरांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
आता याच टीकेला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला आहे. राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना एवढी गाढ झोप लागली की आपल्या खात्यातील अधिकारी काय प्रताप करताहेत हे देखील कळले नाही… केंद्रावर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी त्यांना झोपेतून जागे करा… केंद्र सरकार निद्रिस्त असेल तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेराव घालावे लागेल असं भातखळकर यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांना एवढी गाढ झोप लागली की आपल्या खात्यातील अधिकारी काय प्रताप करताहेत हे देखील कळले नाही… केंद्रावर दुगाण्या झाडण्यापेक्षा आधी त्यांना झोपेतून जागे करा… केंद्र सरकार निद्रिस्त असेल तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का? लवकरच तेराव घालावे लागेल. pic.twitter.com/gsoaaiiV51
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 20, 2021