राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीचा मुद्धा आरोप करणाऱ्या राज ठाकरेंना राष्ट्रवादीचे उत्तर |

 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला गुरुवारी दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला. आता राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. .

“राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे असेही नवाब मलिक म्हणाले.

Team Global News Marathi: