पुरावे असतानाही कुणाच्या सांगण्यावरुन बेड्या ठोकल्या नाहीत, चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर टीका |

 

मुंबई | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर अडचणीत आलेल्या माजी मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. आता एका महिलेने संजय रतजोडवर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप लगावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. इतके पुरावे असून कुणाच्या सांगण्यावरून संजय राठोड यांना बेड्या ठोकल्या नाहीत असा सवाल भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी विचारला आहे.

याबाबत चित्रा वाघ म्हणाल्या की, शिवसेनेच्या संजय राठोडांवर आणखी एक गंभीर आरोप एका महिलेने केला आहे मुळात ज्याच्यामुळे एका भगिनीनी जीव दिला त्याला ढळढळीत पुरावे असतांनाही अजूनही कुणाच्या सांगण्यावरून बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत तो अजूनही मोकाट कसा फिरतोय? की आपण आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पाहतोय? अशी तालिबानी प्रवृत्ती या महाराष्ट्रात महिलांनी कधी अनुभवली नव्हती जिची ठाकरे सरकारच्या काळात अनुभूती मिळतेय असा घणाघात त्यांनी केला.

तसेच चित्रा वाघ यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एकच प्रश्न विचारायचा आहे की, एखाद्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी आत्महत्याच करावी लागेल का? तिला जीवचं द्यावा लागणार आहे का? आज मी महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या भगिनींना आवाहन करते की, रक्षाबंधनच्या दिवशी एक ‘रक्षा-बंधना’ चा धागा मुख्यमंत्र्यांना जरूर पाठवावा जेणेकरून मुख्यमंत्री म्हणून त्यांना महाराष्ट्रातील त्यांच्या भगिनींची व त्यांच्या रक्षणाची जाण होईल असा टोला त्यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: