नागपूर | मुंबईतील समुद्रात क्रूझ पार्टीवरील एनसीबीनं केलेल्या कारवाईबाबत राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एनसीबीनं जी कारवाई केली, यामध्ये काही लोकांना अटक करण्यात आली. तर काही लोकांना सोडून देण्यात आलं. यामध्ये राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या मुलाच्या अतिशय जवळच्या व्यक्तीलाही सोडून देण्यात आलं. मात्र त्याचा याप्रकरणात कोणताही समावेश नव्हता, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नागपूरात बोलत होते.
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानं या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं. फडणवीसांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे त्यांना नेमकं कोणत्या नेत्याचं नाव घ्यायचं होतं याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे. तसेच यावेळी त्यांनी नवाब मलिक यांनी भाजपवर लगावले आरोप त्यांच्यावर उलटून लावले आहे
एनसीबीनं क्रूझवर केलेल्या कारवाईत अनेकांना पकडण्यात आलं होतं. यात जे लोक क्लीन होते. त्यांचा कशातच सहभाग नव्हता अशा लोकांना सोडून देण्यात आलं. ज्या लोकांकडे काही सापडलं होतं. त्यांनाच एनसीबीनं पकडलं. ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे आणि याविरोधात जी संस्था काम करतेय त्या संस्थेच्या पाठिशी आपण उभं राहिलं पाहिजे. पण या प्रकरणात राजकारण केलं जात आहे. खरंतर ज्या लोकांना सोडलं. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस देखील होता. तो क्लान असल्यामुळे मी त्याचं नाव घेत नाही. त्याचा सहभाग नसल्यामुळे त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणं अयोग्य आहे”, असं फडणवीस म्हणाले.