नाना पटोलेंनी ठोकला रश्मी शुक्लांवर ५०० कोटींच्या मानहानीचा दावा,

 

मुंबई | राज्यात काही दिवसांपूर्वी फोन टॅपिंग प्रकरण चांगलंच गाजलं होत. या प्रकरणामुळे सत्ताधाऱ्यांनी थेट विरोधक आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला होता. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महासंचालक पदावर कार्यरत असलेल्या रश्मी शुक्ला यांच्या विरोधात नागपुरातील दिवाणी न्यायालयात तब्बल पाचशे कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

फोन टॅपिंग चे हे प्रकरण २०१७-१८ मध्ये तत्कालीन फडणवीसांच्या कार्यकाळात घडले होते. त्यावेळी रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यामध्ये या अनुषंगाने तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांनी राजकीय हितसंबंधामधून नाना पटोले यांच्यासह एकूण सहा लोकप्रतिनिधींचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे.

नाना पटोले यांनी नागपुरातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात रश्मी शुक्ला यांच्यावर ५०० कोटींचा जो मानहानीचा दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यामध्ये केंद्रीय गृह विभागाचे सचिव,राज्य गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नागपूर पोलीस आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त आणि फिर्यादी पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांचा समावेश आहे. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील एड सतीश उके यांनी कोर्टात पटोलेंच्या वतीने कामकाज पाहिले.

अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचे दाखवून आमचे फोन टॅप करण्यात आले. माझे नाव अमजद खान असे ठेवले होते. तर बच्चू कडू यांचे निजामुद्दीन बाबू शेख अशी मुस्लीम नावे ठेवली होती. फोन टॅपिंगचा मुद्दा मी विधानसभेतही उपस्थित करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या चौकशीत रश्मी शुक्ला दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले होते.

Team Global News Marathi: