उत्तर महाराष्ट्राचा दौरा अर्धवट सोडून नाना पटोले निघाले दिल्ली दौऱ्यावर !

जळगाव | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नं पटोले चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. त्यात आघाडी सरकार ५ वर्षे चालणार असल्याचं सांगताना, नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देऊन मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या चिंतेत अधिक भर घातली होती.

सध्या नाना पटोले हेउत्तर महाराष्ट्र दौरा सुरू आहे. मात्र, नानांना तातडीने दिल्लीचे बोलवन आल्याने ते आपला दौरा अर्धवट सोडून उद्या दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या पुढील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्यासाठी काम देखील सुरू आहे. तसेच, विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल, येत्या पावसाळी अधिवेशनात त्याची निवड होणे अपेक्षित आहे.

मात्र सदर निवड होण्यासाठी सर्व आमदार सभागृहात असणे अपेक्षित असते. गेल्या अधिवेशनात अनेक आमदार कोविड संसर्गामुळे येऊ शकले नाहीत, असे त्यांनी जळगावमधील दौऱ्यात असताना सांगितले होते. त्यामुळेच, आता विधानसभा अध्यक्षांची निवड आणि आगामी निवडणुकासंदर्भात चर्चा करण्यासाठी नाना पटोले शुक्रवारी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत, अशी माहिती काँग्रेसच्या खात्रीदायक सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे.

Team Global News Marathi: