माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतली – संजय राठोड

 

औरंगाबाद | टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शविसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच राठोड यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याचे संकेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तसे संकेतच दिले आहेत.

यावर संजय राठोड यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राठोड यांच्या कॅबिनेटमधील पुनरागमनावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. संजय राठोड हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

राठोड म्हणाले की, मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. माझ्या मंत्रीपदाबाबद्दल मला काही बोलायचं नाही. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही, असं राठोड यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: