“माझ्या मुलीला आता मी महाराष्ट्रात ठेवणार नाही..”; असं का म्हणाले जितेंद्र आव्हाड i

 

ठाणे | शवासीना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री iउद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी दुपारी सक्तवसुली संचनालय अर्थात ईडीकडून कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेहुणे असलेले श्रीधर पाटणकर यांची अंदाजे साडेसहा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. त्यात ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील ११ सदनिका ईडीने जप्त केल्याची माहिती देण्यात आली आहे.

सदर कारवाई पीएमएलए कायद्यानुसार ईडीने ठाण्यात ही कारवाई केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतेमंडळी यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे बंधू असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे मी आता माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

“राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. राज्य सरकारने काही नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, पण कोणाला तुरूंगात डांबलेलं नाही. आता आज झालेल्या कारवाईनंतर अशा गोष्टींवर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल हे नक्की. पण माझं मत सांगायचं तर आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही”, असं सूचक विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

“राज्याने कुणावरही कधी अशी सूडबुद्धीने कारवाई केलेली नाही. कुणाला जेलमध्ये टाकलंय असं झालेलं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे. विरोधकांनी सरकार अस्थिर करायचा प्रयत्न करायला हरकत नाही. पण ते अशा माध्यमातून करावं हे चुकीचं आहे ते विधान त्यांनी केले होते.

Team Global News Marathi: