मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढवली, ठाकरे सरकारचा निर्णय

 

मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना राज्य सरकारने मंत्री मंडळात आता महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. या निर्यामुळेआता मुंबई मानपामध्ये नगरसेवकांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. मुंबईत आणखी नऊ वॉर्ड तयार करण्याचा निर्णय झाल्यामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ इतकी होणार आहे.

मुंबई मानपामध्ये सध्या निर्वाचित सदस्यांची संख्या २२७ इतकी आहे. ही संख्या २००१ च्या जनगणनेच्या आकडेवारीआधारे निश्चित केलेली आहे. २०११ च्या जनगणनेनंतर निर्वाचित सदस्यांच्या संख्येत बदल करण्यात आलेला नाही व ही सदस्य संख्या कायम राहिली. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार २००१ ते २०११ या दशकात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येमध्ये ३.८७ टक्के इतकी वाढ झाली आहे.

दरम्यान,पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे निवडणुकीला आता अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत मुख्य स्पर्धा ही शिवसेना विरूद्ध भाजप अशी राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- शिवसेना एकत्रित लढणार आहेत. तर, कॉंग्रेस स्वतंत्रपणे ही निवडणूक लढविणार असल्याची घोषणा काँग्रेस नेत्यांकडून केली जात आहे

Team Global News Marathi: