मुंबई महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ

 

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष युद्ध स्तरावर तयारीला सुरुवात केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपने कंबर कसली असून याचाच एक भाग म्हणून ‘जागर मुंबईचा’ मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सडकून टीकास्त्र सोडले. हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम, उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी आहे, असा हल्लबोल त्यांनी ठाकरेंवर केला.

स्वतःला हिंदुत्वाचे, मराठीचे आणि मुंबईचे ठेकेदार मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदू समाजात आणि मुंबईतील जनतेत फूट पाडण्याचे काम सुरू केले आहे. त्यांनी मुंबईच्या विकासात खोडा घातला असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला. यापूर्वी सुद्धा भातखळकर यांनी उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर केलेल्या महाविकास आघाडीच्या युतींवरून
घणाघाती टीका केली होती.

उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून मुख्यमंत्रिपद मिळवले. मुंबई मेट्रोच्या वाढत्या खर्चाला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. मुंबईतील अनेक प्रकल्प रोखण्याचे काम उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी केले. कोणताही व्यवसाय न करता उद्धव ठाकरे यांची संपत्ती कोट्यवधी रुपये कशी झाली, महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ झाले आहेत, अशी बोचरी टीका भातखळकर यांनी केली.

Team Global News Marathi: