मुलासाठी बाळासाहेबांनी पुतण्याला बाजूला केलं, आता ते असते तर…’;

 

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यादरम्यान अजित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. शिंदे गटाचा आमदार गोळीबार काय करतो, आमदाराचा मुलगा शिवीगाळ काय करतो, बोरिवलीचा आमदार विरोधकांचे हातपाय तोड्याच्या चिथवण्या काय देतो, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं अजित पवार म्हणाले. शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती आणि नशा आहे. आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती, अशी टीका अजित पवारांनी केली आहे.

शिवाजी पार्कच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की माझे आता वय झाले आहे. शिवसेनेचे या पुढील नेतृत्व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहा. बाळासाहेबांनी याबाबत त्यांच्या पुतण्याला ही बाजूला केले होते. हे आमदार मात्र तिकडे पळाले. बाळासाहेब हयात असते तर एकनाथ शिंदे यांची बिन पाण्याने केली असती, अशी टीका अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे अजित पवार यांनी जळगाव येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती आणि नशा चढली आहे. चून चून के मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का? असा सवाल करत अजित पवारांनी संजय गायकवाड यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी अजित पवार यांनी आमदार संजय गायकवाड यांची मिमिक्री करत कार्यकर्त्यांमध्ये एकच हसा पिकवला.

Team Global News Marathi: