मुख्यमंत्री गणपतीत गरागरा फिरले, पण… आदित्य ठाकरेंनी साधला शिंदेंवर निशाणा

 

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेतील पुढील टप्प्याची सुरुवात रत्नागिरीतून केली. यावेळी आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातून बाहेर जाणारे प्रकल्प रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे आदित्य यांनी म्हटले.

मुख्यमंत्री गणपतीत 250 मंडळं फिरली, आता पुन्हा त्यांना दांडिया, गरबासाठी सगळी फिरायचे असेल. मात्र, त्याआधी त्यांनी राज्यातील प्रकल्पांकडे लक्ष द्यावे, अशा शब्दांत आदित्य यांनी हल्लाबोल केला. राज्याच्या उद्योगमंत्र्यांना वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पाबाबत काहीही माहिती नसणे हे धक्कादायक असल्याचे आदित्य यांनी म्हटले.

वेदांता-फॉक्सकॉनच्या मुद्यावर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. आताच्या उद्योगमंत्र्यांना या प्रकल्पाबाबत काहीच माहित नव्हते. या प्रकल्पासाठी मविआ सरकारकडून प्रयत्न सुरू होते असेही आदित्य यांनी म्हटले. जूनमध्ये वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने तळेगावची जागा पाहिली.

राज्यात दीड लाख कोटींची गुंतवणूक येणार होती. त्याशिवाय, एक लाख रोजगार येणार होते. वेदांता-फॉक्सकॉन तळेगावात येणार होते. गद्दारांनी सरकार पाडल्यानंतरही एमआयडीसीने प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र, या सरकारने काहीच प्रयत्न केले नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला

Team Global News Marathi: