मुंबई | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित मागणी केली आहे. दहिसर पूर्व-पश्चिम आणि अंधेरी पूर्व-पश्चिम या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी भातखळकर यांनी पत्र लिहून केली आहे.
या संदर्भात ते ट्विट करून म्हणतायत की, मुंबईच्या मेट्रो विकासात आणि दोन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केलेल्या या कामात त्यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनाही सन्मानाने याच्या उद्घाटनाला बोलावण्यात यावे, अशी मागणी त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री महोदय, कळकळीची विनंती!!! यावेळी तरी मनाचा कोतेपणा दाखवू नका… pic.twitter.com/lrLzuwufpZ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 22, 2022
तसेच मुंबईतील मेट्रो विकासात केंद्र सरकारचे महत्वाचे योगदान आहे. त्याचबरोबर मुंबईत मेट्रो प्रकल्पासाठी फडणवीसांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत फडणवीस सरकरने केलेले प्रोजेक्ट आपल्या नावाने उद्घाटन करून आपल्या मनाचा कोतेपणा दाखवू नये, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.