मंत्र्यांच्या ड्रायव्हरला ४० हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला १२ हजार पगार हे चुकीचेच

 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागासणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. त्यातच पागवाढीची मागणी मान्य करण्यात अली असून अंदोलन मागे घेण्यात यावे अशी विनंती परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. तसेच मंत्री अनिल परब यांनी घोषणा करतानाच एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं.

मात्र, राज्यातील जवळपास ९० हजारपैकी ७३ हजार एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण या एकाच मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. मंत्र्यांच्या आणि कलेक्टरच्या गाडीच्या ड्रायव्हरला ४० हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला १२ हजार पगार हे चुकीचंच असल्याचं बच्चू कडू म्हणाले. इस्लामपूरमधील कृषी प्रदर्शन उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

जो एसटी कर्मचारी हजारो लोकांना घेऊन प्रवास करतो, त्याला फक्त १२ हजार पगार मिळत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. पण आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंदोलन मागे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू, असं बच्चू कडू म्हणाले. आता बच्चू कडू यांनी थेट आघाडी विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकार काय निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: