मंत्री गर्दी करून धुडघूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला नकार – राज ठाकरे

मनसेने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी पार्क येथील कार्यक्रमाला मनपाने परवानगी नाकारली होती. साध्य रयत विशेष करून मुंबई वाढत्या असलेल्या कोरोना रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर मनपाने ही परवानगी नाकारली आहे. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

राज ठाकरे म्हणाले या संदर्भात बोलताना म्हणाले की “मंत्री गर्दी करून धुडगूस घालतायेत आणि शिवजयंती, मराठी भाषा दिनाला सरकार नकार देते. करोनाचं संकट येतंय असं वाटत असेल, तर निवडणुकाही पुढे ढकलाव्यात,” अशा शब्दात राज यांनी संताप व्यक्त केला.

दादरमधील शिवाजी पार्क येथे झालेल्या मराठी स्वाक्षरी मोहीम कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर राज यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावर राज म्हणाले, “खरं तर त्यांच्या मनात आहे की, नाही. फक्त आपलं संभाजीनगरसारखं करायचं. अशा प्रकारचे दिवस आल्यानंतरच सरकारला जाग का येते? त्यांना असं बोलावं का वाटतं. इतकी वर्ष यांच्या हातातच सरकार आहे. मग का होत नाहीत या गोष्टी. या मुद्द्यात राजकारण कसलं. इच्छा असली पाहिजे. इच्छा असेल तर होईल,” असं राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: