Monday, January 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

..म्हणून भाजप नेत्यांकडून शिवरायांबद्दल चुकीचे उद्गार, मिटकरींनी सांगितलं खरं कारण

by Team Global News Marathi
December 9, 2022
in राजकारण
0
..म्हणून भाजप नेत्यांकडून शिवरायांबद्दल चुकीचे उद्गार, मिटकरींनी सांगितलं खरं कारण

राज्यातील शेतकरी संकटात आहे. पण राज्य सरकारला शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यात फार रस नाही. त्यामुळेच छत्रपती शिवरायांवर भाजप नेत्यांकडून वारंवार चुकीची वक्तव्य करून जनतेचं लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि इतर काही मंत्र्यांनी केलेली वक्तव्य याच मालिकेतील असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. सोलापूरात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण महोत्सवात केलेल्या वक्तव्याचाही अमोल मिटकरींनी खरपूस समाचार घेतला. एकनाथ शिंदेंना अजूनही माहिती नाही की आपण मुख्यमंत्री आहोत. समृद्धी महामार्गाच्या पाहणी वेळेस स्टेअरिंग फडणवीसांच्या हातात होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळी मुख्यमंत्री पदावर होते, त्या त्या वेळी राज्यातील शेतकरी वाऱ्यावर सोडला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला. याबद्दल जनजागृती व्हावी म्हणूनराज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मिळाव्याचं आयोजन केल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली.

राज्यात दिवसेंदिवस ‘गोवर’च संकट वाढत आहे. सध्याचा आरोग्यमंत्री कोण आहे हे मला माहिती नाही, अशा शब्दात मिटकरी यांनी टीका केली. तर कोरोना काळातील राजेश टोपे यांच्या कामाशी त्यांनी तानाजी सावंत यांची तुलना केली. आरोग्यमंत्री तानाजी सवंतांना हाफकिन माहिती नाही, गोवरचा प्रादुर्भाव कसा टाळावा हे माहिती नाही, असे मिटकरी म्हणाले.

राज्यातील शेतकरी संकटात असताना त्या मुद्द्याला विचलित करण्यासाठी भाजपातील नेत्यांकडून शिवरायांवर जाणीवपूर्वक चुकीचे विधान केले जातात. राज्यपाल, मंगलप्रभात लोढा, सुधांशु त्रिवेदी, पडळकर, प्रसाद लाड ही लोक शिवाजी महाराजांच्या विषयाला हात घालून मुद्दे भरकटवत आहेत, असा आरोप मिटकरी यांनी केला

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
४८ तासाच्या अल्टिमेटनंतर शरद पवार सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं? भाजप नेत्याने डिवचलं

४८ तासाच्या अल्टिमेटनंतर शरद पवार सीमाभागात जाणार होते, त्याचं काय झालं? भाजप नेत्याने डिवचलं

Recent Posts

  • कोल्हापुरात धक्कदायक प्रकार शिक्षकानेच दाखवलं नववी-दहावीतील मुलींना पॉर्न व्हिडीओ
  • अभिनेत्री राखी सावंत हिच्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याची भावुक पोस्ट
  • महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल
  • “पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”
  • चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group