मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील तसेच पुण्यामध्ये आज ईडीकडून दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली. त्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या 11 तासांपासून छापेमारी सुरुच असल्याने कोल्हापुरात हसन मुश्रीफ समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या छापेमारीचा निषेध केला आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील कथित भ्रष्टाचारा प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे.
त्यावर आता मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे. मुश्रीफ यांनी यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सत्ता आली तरी कारवाई केली जाते, असे म्हणत भारतीय जनता पक्षावर आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. तसेच ईडीकडून कुठलाही गुन्हा नाही, समंस नाही आणि नोटीस देण्यात आली नाही. थेट छापे टाकण्यात आले.
आता सायंकाळी छापेमारी संपल्यावर नवीन काय आहे ते कळेल असंही हसन मुश्रीफ यांनी म्हंटलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांना आव्हान दिले आहे. ते म्हणाले, “कोल्हापूरला सर्वप्रथम आई लक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. त्यामुळे मी मुश्रीफ यांना चॅलेंज करतो, त्यांनी आता मला रोखूनच दाखवावे.” मागच्या वेळी माफिया सरकार होतं.