मराठी पाट्यावरून मागच्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले आहे त्यातच मागच्या बुधवारी राज्य सरकारने सर्व दुकानावर झळकलेल्या इतर भाषेच्या सर्व पाट्या मराठीत असाव्यात असा फतवाच काढला होता. या निर्णयाविरोधात काही परप्रांतीय दुकानदारांनी विरोध दर्शवला तर काहींनी या निर्णयाचे स्वागत करून सरकारला पाठिंबा दिला होता.
पण मराठी पाट्या बदलून मराठी माणूस व्यवसायिक होऊ शकतो का? कारण आजही मराठी पाट्या बदलल्या तरी त्यात मालक म्हणून वावरणारा परप्रांतीय राहणार आहे अन त्यांच्या हाताखाली काम करणारा मजूर, कामगार हा मराठीच असणार आहे.
असो पण प्रत्येक पाच वर्षांनी येणाऱ्या नव्या सरकारने तसेच इतर राजकीय पक्षांनी मराठी तरुणांना व्यवसायामध्ये उतरण्यासाठी काही मदत केली का? आज मराठी तरुणांना व्यवसाय करण्यासाठी कोणत्या बँक पुढे येऊन मदत करतात का? तर उत्तर आहे नाही.