Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही, सुजय विखेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

by Team Global News Marathi
October 28, 2022
in राजकारण
0
मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही, सुजय विखेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

 

ज्या महाराष्ट्राचे आपण मुख्यमंत्री होतो तो महाराष्ट्र दिसतो कसा हे पाहण्यासाठी ठाकरे सध्या राज्याचा दौरा करत आहे. पद गेल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती पाहायला त्यांना वेळ मिळाला आहे. मात्र, मंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र कधी पाहिलाच नाही अशी टीका भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना निवांत वेळ दिला असल्याचेही विखे पाटील यावेळी म्हणाले.

सध्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. याबाबत बोलताना खासदार विखे पाटील म्हणाले की, यावर कॅबिनेटमध्ये चर्चा सुरु असते. NDRF च्या निकषापेक्षा जास्त मदत करण्याबाबत बागायत, जिरायत क्षेत्रानुसार मदत देणं याबाबत चर्चा सुरु आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेईल अशी मला खात्री असल्याचे सुजय विखे पाटील म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल ना होईल हा दुसरा भाग आहे. परंतू त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होईल याचं नाव पहिलं निश्चित करावं, असे विखे पाटील म्हणाले. कुटुंबामध्ये कोणाला ते नेतृत्व देताय आणि मग त्यावरती कारवाई करावी. पक्ष जे चालवतात त्यांच्या तोंडून तो निर्णय आला तर त्यावर मी भाष्य करेल असेही विखे पाटील म्हणाले.

राहिला प्रश्न अजित पवार यांच्या नेतृत्वाचा, ते या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं काम अतिशय चांगला आहे, त्यांनी नेतृत्व करावं किंवा नाही करावं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याचे विखे पाटील म्हणाले. राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार असून ते पुढील दहा ते पंधरा वर्षे हटत नाही. ज्यांना पदं वाटून घ्यायची आहेत, त्यांनी घरात बसून आपापसामध्ये वाटुन घ्यावी असा खोचक टोला देखील त्यांनी रोहित पवारांना लगावला.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
सासुरवाडीची शाखा सांभाळायला पाहिजे होती, मनसेचा खोचक टोला

सासुरवाडीची शाखा सांभाळायला पाहिजे होती, मनसेचा खोचक टोला

Recent Posts

  • यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या आशा अन् आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल
  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group