Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

“महाविकास आघाडीत जाणं म्हणजे असंगाशी संग करणं” राजू शेट्टी यांनी मांडले परखड मत

by Team Global News Marathi
November 1, 2022
in राजकारण
0
“महाविकास आघाडीत जाणं म्हणजे असंगाशी संग करणं” राजू शेट्टी यांनी मांडले परखड मत

 

शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीचे नवे सरकार स्थापन झाले.महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत टीका केली होती. आता भाजप-शिंदे गट युतीचे नवे सरकार आल्यावर कोणासोबत जाणार, हे राजू शेट्टी यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच महाविकास आघाडीत जाणे म्हणजे असंगाशी संग करणे होय, अशी घणाघाती टीकाही राजू शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टी नक्की महाविकास आघाडी की युतीचा भाग असणार याची चर्चा सुरु होती. त्यावर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजू शेट्टी यांनी कुणाशीही युती किंवा आघाडी न करता ‘एकला चलो रे’ची भूमिका त्यांनी घेतली आहे. महाविकास आघाडीत जाणे म्हणजे असंगाशी संग करणे होय, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

निवडणुका लढवणे किंवा राजकारण करणे हा आमचा धंदा नाही. शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी, वेगवेगळ्या सभागृहात प्रतिनिधी पाठवण्यासाठी आम्ही असंगाशी संग करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यात आम्हाला चांगले अनुभव आला नाही. त्यामुळे यापुढे आम्ही महाविकास आघाडी किंवा भाजप यांच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही स्वतंत्रपणे दोन्ही आघड्यापासून दूर राहत कार्य करणार, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही सरकारचे १०० दिवसात परीक्षण करता येत नाही. या सरकारने आपण लोकोपयोगी सरकार असल्याची साधी चुणूकही या शंभर दिवसात दाखवलेली नाही. सरकार दहीहंडीत गोविंदा, गणपतीमध्ये डॉल्बीबाबत जी तत्परता दाखवली ती शेतकऱ्यांबाबत का दाखवत नाही, असा सवाल करत महाराष्ट्रात ऊस वगळता एकही पीक अतिवृष्टीमुळे शिल्लक राहिले नाही. मात्र कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे बोलतात, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
कुलुप घेऊन जात नौटंकी का करता? पुन्हा सोमय्यांनी साधला किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाना

कुलुप घेऊन जात नौटंकी का करता? पुन्हा सोमय्यांनी साधला किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाना

Recent Posts

  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार
  • ‘पठाण’ची यशस्वी वाटचाल’, कार्तिकच्या सिनेमाची रिलीज डेटमध्य बदल
  • सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group