घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही! –शरद पवार

महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. बारामती येथे आज पत्रकारांनी शरद पवार यांना राज्यपाल नियुक्त सदस्यांबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्यसरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते असेही शरद पवार म्हणाले.

आमची अपेक्षा अशी होती की मोदीसाहेब स्वतः ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्यपालांकडून त्यांना अशाप्रकारची अडवणूक होत असल्याची त्यांची तक्रार होती. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने त्यांना हे सहन करावं लागलं हे त्यांच्या राज्यातसुध्दा. महाराष्ट्रासारख्या राज्यात राज्यपाल करतायत आणि असे असताना केंद्रसरकार बघ्याची भूमिका घेतेय ही गोष्ट चिंताजनक आहे असेही शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्र : कुशल कारागिरांना राज्य शासन आता करणार प्रमाणित –नवाब मलिकपरभणीत पोलीस अधिकार्‍यांकडून पत्रकारांना मारहाणमुलीस मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी कोपरा किनगाव येथील सरपंचासह 16 जणांविरुध्द गुन्हा दाखलबेपत्ता नुसेबाचा मृतदेह दाभोळ खाडीत सापडल्याने खळबळमध्यरात्री समुद्रातील मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेवर हल्ल्याचा प्रयत्नपाच राज्यांच्या निवडणुकांवर शरद पवारांचे मोठे विधान, ‘हे’राज्य वगळता भाजपचा सुपडा साफ होणार पाच राज्यांच्या निवडणुकांवर शरद पवारांचे मोठे विधान, ‘हे’ राज्य वगळता भाजपचा सुपडा साफ होणार

 

शेतकरी जसे अस्वस्थ आहेत तशी…

कृषी कायद्यासंदर्भाच्या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत तशी संसदही अस्वस्थ आहे त्यामुळे त्याची प्रतिक्रिया उद्या संसदेत उमटली तर चुकीचे ठरणार नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलनाला 100 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना खासदार शरद पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्रसरकारने सामंजस्यपणाची भूमिका घेतली नाही आणि संसद बंद पडली. दोन्ही सभागृह चालू शकली नाहीत. त्यामुळे उद्या (सोमवारी) काय होतेय हे पहावे लागेल असेही शरद पवार म्हणाले.

अशा लोकांवर काय भाष्य करावं!

काही लोकांचं बेजबाबदारपणे बोलण्याचं वैशिष्ट्य असतं त्यामुळे अशा लोकांवर काय भाष्य करावं त्यांना महत्त्व न देणं हेच त्यांना उत्तर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजपचे साक्षी महाराज यांचे नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला आहे.

बारामती येथे पत्रकारांनी भाजपच्या साक्षी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर विचारणा केली असता शरद पवार यांनी त्यांचं नांव न घेता चांगलाच समाचार घेतला. बेजबाबदारपणे बोलण्याचं काही लोकांचं वैशिष्ट्य असतं. कुणी शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणत असतील कोण दहशतवादी म्हणत असतील तर अशा लोकांवर काय भाष्य करावं असा टोला मिश्किल हास्य करत शरद पवार यांनी लगावला.

साभार सामना ऑनलाइन

ग्लोबल न्युज नेटवर्क: