मुंबई : राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठया प्रमाणात कोरोना लसीची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येत आहे. मात्र याच मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाष्य करत आघाडी सरकारला झापले होते. तसेच लसीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले होते. याच मुद्द्यावरून केंद्रीयमंत्री जावडेकर यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबई, पुण्यात बसावं आणि या ठिकाणची परिस्थिती पाहावी. त्यांचंही महाराष्ट्राशी नातं आहे, असे म्हणत राऊत यांनी प्रकाश जावडेकर चांगलेच झापले होते.
तसेच यावेळी त्यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या विरोधी अप्सखनेते देवेंद्र फडणवीस यांना झापले होते. फडणवीसांनी लॉकडाऊनला विरोध केलाही असेल. ही त्यांच्या पक्षाची राज्याची भूमिका आहे. त्यांची देशपातळीवरील भूमिका निराळी असू शकते.
जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जारी केला तर तेव्हा फडणवीसांची भूमिका काय असेल? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाऊन करा अशी त्यांची भूमिका असेल का?,” असं म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.