संभाजी राजे छत्रपती यांनी काही वेळा पूर्वी आपण राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपल्यामध्ये झालेल्या बैठकीची सविस्तर माहिती देऊन थेट मुख्यमंत्र्यांना खोटं पाडलं होतं अशातच आता राज्यभरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे.
‘छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणं वेदनादायक होतं.उठता बसता महाराजांचं नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायची लायकी नाही असंच म्हणावं लागेल. बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत’, असं गजानन काळे म्हणाले आहेत.
संभाजी राजे यांची राज्यसभा निवडणुकीतून माघार घेणं अनेकांच्या जिव्हारी लागलंय. गजानन काळे यांनी संभाजी राजेंच्या या निर्णयावर ट्विटरच्या माध्यमातून भाष्य केलंय. छत्रपतींना असं व्यथित होताना पाहणं वेदनादायक असल्याचं त्यांनी म्हटलंय. संभाजी राजेंबाबत बोलताना त्यांनी शिवसेनेलाही लक्ष केलं. ‘उठता बसता महाराजांचं नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायची लायकी नाही असंच म्हणावं लागेल. बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत’, असं गजानन काळे म्हणालेत.
छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते
उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात "शिव" वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल.
आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत.— Gajanan Kale (@GajananKaleMNS) May 27, 2022