आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल, संभाजीराजेंना राग अनावर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यासह रायगडावरही उत्साहाचं वातावरण पसरले आहे. तसेच शिवजयंतीनिमित्त रायगडावर भारतीय पुरातत्व विभागाने रोषणाई करण्यात आलेली आहे. मात्र यावर खासदार संभाजीराजेंनी सांगतो व्यक्त केला आहे.

भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल,” असा शब्दात संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे. करोनामुळे शिवजयंती सोहळा साजरा करण्यावर राज्य सरकारकडून अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

शिवनेरी किल्ल्यासह स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरही रोषणाईचा झगमगाट करण्यात आला आहे. मात्र, भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेल्या रोषणाईबद्दल छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे.

“भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून. या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो असा शब्दात राग व्यक्त केला आहे.

Team Global News Marathi: