आघाडीने आतापर्यंत स्वाभिमानीला विश्वासात घेतलं नाही, राजू शेट्टी यांची घाणघाती टीका

 

कोल्हापूर | पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसून येत आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा शेट्टी यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे. मागच्या काही दिवसापासून शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

शेट्टी म्हणाले की, जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार बनत होते. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांचा सूचक होतो. मात्र, आता स्वाभिमानी ही महाविकास आघाडी सरकारचा भाग आहे हे ते विसरले आहेत. महाविकास आघाडीने आतापर्यंत स्वाभिमानीला विश्वासात घेतलं नाही, अशी टीका शेट्टी यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर येथे नुकतीच ऊस परिषद पार पडली. यावेळी शेट्टी यांनी आघाडी सरकारमध्ये राहायचे कि नाही याबाबात लवकरच निर्णय घेणार असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर शेट्टी यांनी पुणे इथे आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला होता.

Team Global News Marathi: