आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा दाखवून दिले आता बिलोलीतही दिसेल

 

मुंबई |राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढेही महाविकास आघाडीचे सरकार येईल,अस वक्तव्य पुण्यात केलं होतं. आणि आता याच वक्तव्याचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही, असा टोला भातखळकर यांनी पवारांना लगावला आहे.

‘महाविकास आघाडी पाच वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत येईल इति शरद पवार. महा विकास आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा पंढरपूरला दाखवून दिलेच आहे. आता परत देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही’ असं ट्वीट करुन भातखळकरांनी शरद पवारांवर टिकेची झोड उठवली आहे.

पवार म्हणाले की, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पण ते आतापर्यंत आलेच नाहीत. भाजपचे नेते सांगतात महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल. पण दोन वर्षे झाली, सरकार खंबीरपणे उभे आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जर महाविकास आघाडी अशीच अबाधित राहिली तर पुढेही उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत येईल.

 

Team Global News Marathi: