शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा काल मुंबईत दसरा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच यावरून आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
‘दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सर्वच अळणी पाणी’, असं म्हणत बाळासाहेब ठाकरेंचं भाषण सर्वांसाठी पर्वणी होती. पण आता उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे फक्त अळणी पाणी असल्याचं त्यांनी ट्विट करून म्हणत शिवसेना पक्षप्रमुखांवर टीका केली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून भाजप नेते प्रवीण दरेकर तसेच नितेश राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल चढवला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता सगळंच आळणी पाणी असल्याचं म्हणत गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी, म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी लगावली आहे. यासर्व प्रकरणात आता शिवसेनेकडून नेमकं काय प्रत्युत्तर मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.