मुंबई महानगरपालिकनं २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात मुंबई महानगरपालिकेनं शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष्य दिले आहे. मुंबईतील रुग्णालयांचा पुनर्विकास करण्यासाठी महानगरपालिकेनं निधीची तरतूद करण्यात आली आहे.अर्थसंकल्प सादर केल्यानंतर भाजप नेत्यांनी हा बजेट कारभाऱ्यांसाठी आणि कंत्राटदारांसाठी असल्याची टीका केली आहे.
अर्थसंकल्पात मुंबईकरांसाठी योजनांचा आभाव आणि कारभाऱ्यांना अधिक भाव असा बजेट असल्याची टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच कोविडमुळे अडचणीत आलेल्यांचाही मुंबई महानगरपालिकेनं विचार केला नाही असा आरोप शेलार यांनी केलाय.भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर टीकास्त्र डागलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये मुंबईतील सर्वसामान्य माणसांसाठी अधिक सोयी आणि संकल्पना आणायला हव्या होत्या असे भाजप नेत्यांचे मत आहे.
एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पा एवढा मुंबई महापालिकेचा ४५ हजार ९४९ कोटींचा अर्थसंकल्प आज सादर झाला. वॉटर, गटर आणि “टेंडर” या पेक्षा मुंबईकरांसाठी एखादी लक्षवेधी ठरावी अशी संकल्पना, योजना याचा अभाव आणि कारभाऱ्यांना अर्थसंकल्पात अधिक “भाव” यापेक्षा काहीही वेगळं नाही अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.