कुठल्याही निवडणुका लागल्या तरी मला बोलवा, अमित ठाकरे यांचे मनसे सैनिकांना आवाहन

 

मनसे नेते अमित ठाकरे देखील सध्या दौरा करत आहेत आणि मनसैनिकांशी संवाद साधत आहेत. तसंच सर्वसामान्य लोकांशी, तरुणांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये जान भरण्याचं, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. अश्यातच त्यांनी आगामी निवडणुकांविषयी भाष्य केलंय. “येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे.

तसेच येत्या निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी मी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू. आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीदेखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो, कामाला लागा”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

“येणारी प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या पक्षाने केलेलं काम आणि विचार घरोघरी पोहचवू. येत्या निवडणुकीत सक्षम उमेदवार द्यायचा आहे आणि तो निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करायचे आहेत. त्या निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी मी तयार आहे. कुठलीही निवडणूक लागली तरी मला बोलवा. आपण जोरदार प्रचार करू. आपल्याला प्रत्येक निवडणूक लढायची आहे आणि जिंकायचीदेखील आहे. त्यामुळे मनसैनिकांनो, कामाला लागा”, असं अमित ठाकरे म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: