कोरोना काळात पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहिती – ऋतुराज पाटील

 

कोल्हापूर | काँग्रेस उमेदवार जयश्रीताई जाधव यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे तरुण आमदार कोल्हापुरात दाखल झाले होते यावेळी सर्व नेत्यांनी भाजपावर सडकून टीका केली होती तसेच यावेळी कोल्हापूर दक्ष मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.

कोल्हापूरची संस्कृती बघितली तर ही निवडणूक बिनविरोधी व्हायला पाहिजे होती, पण भाजपनं ही निवडणूक लावली. पण चार राज्यातील जनता वेगळी आणि कोल्हापूरची जनता वेगळ्या विचारांची आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावं तसंच कोरोनाच्या संकटात कोल्हापुरात कोण होतं आणि पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहीत आहे असा टोलाही त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. ते महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ बोलत होते.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले की, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. पण पण भाजपनं ही निवडणूक लावली. पण चार राज्यातील जनता वेगळी आणि कोल्हापूरची जनता वेगळ्या विचारांची आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावं. कोरोनाच्या संकटात कोल्हापुरात कोण होतं आणि पुण्याला कोण पळून गेलं हे सगळ्यांना माहीत आहे असा टोला सुद्धा त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला होता.

Team Global News Marathi: