कोल्हापूर | भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर घोटाळ्याचे आरोप लावून एकच खळबळ उडवून दिली होती. तसेच त्यांनी कागल येथे मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या संताजी घोरपडे साखर कारखान्यात सुद्धा मुश्रीफ यांनी घोटाळा केल्याचा आरोप लगावत कोल्हापुरात येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कोल्हापूर बंदी करून त्यांची गोची केली होती. त्यामळे त्यांना कराड येथेच उतरावे लागलं होते.
त्यातच आता भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरील निर्बंध कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हटवले आहेत. यामुळे आता किरीट सोमय्यांच्या दौऱ्यातला अडथळा दूर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच, कोल्हापूरमधील कारखान्याची पाहणी करुन पोलिसांत मुश्रीफांविरोधात तक्रार सोमय्या तक्रार करणार आहेत.
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावरील जिल्हाबंदी हटवली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा आता नॉनस्टॉप होणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन जारी करत याची घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, २८ सप्टेंबर रोजी किरीट सोमय्या यांचा नियोजित कोल्हापूर दौऱ्यादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी माझी खात्री झाली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी बाबतचा पारित केलेला आदेश विखंडित करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
Kolhapur Collector just inform Me that Restrictions on My Kolhapur Entry Withdrawn pic.twitter.com/WMaywNZpwU
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 27, 2021