‘ कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा शिंदे सरकारला पुन्हा थेट इशारा

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मागच्या आठवड्यात सांगली जिल्ह्यातील जतमधील 40 गावांचा लवकरच कर्नाटकात समावेश होईल असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला होता.दरम्यान यावरून महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांनी बोम्मईंच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन पुकारले होते. हा वाद जोरात सुरू असताना महाराष्ट्राचे नेते याविषयावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावरून आता बोम्मईंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नेत्यांना इशारा दिला आहे. त्यांनी ट्वीट करत थेट आव्हान दिले आहे.

महाराष्ट्राचे शिष्टमंडळ काल भेटल्यानंतर बोम्मई ट्वीट करत म्हणाले की, महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे म्हणत त्यांनी राज्याच्या नेत्यांना डिवचलं आहे.

पुढच्या दोन दिवसांत मी कर्नाटकच्या खासदारांना केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांची भेट घेण्यास सांगितल आहे. तसेच राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे बोम्मई म्हणाले आहेत. सीमा प्रश्नावर समन्वयातून मार्ग काढला जावा. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. असं असताना कर्नाटक सरकारकडून हेकेखोरपणा केला जात आहे. त्यामुळे अमित शाह मध्यस्थी करताना कर्नाटक सरकारच्या अडेलट्टूपणावरही चर्चा करतील असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

Team Global News Marathi: