“ज्यांना यायचं होतं ते आलेच नाहीत आणि जे आले ते येणारच होते.” अमृता फडणीवसांचा उद्धव ठाकरेंना टोला

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. तसेच त्यांचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस प्रकाशझोतात आल्या आहेत. याच कारण म्हणजे अमृता फडणवीस यांनी झी मराठीवरील नुकतेच सुरु झालेल्या ‘बस बाई बस” या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी अप्रत्यक्षरित्या टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.

झी मराठीच्या ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता सुबोध भावे सध्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस हजेरी लावणार आहेत. नुकतेच या कार्यक्रमाचे काही प्रोमो झी मराठीने शेअर केले आहेत. यात विविध गंमतीजमती पाहायला मिळत आहे.

‘बस बाई बस’ या शोमध्ये अमृता फडणवीस यांना एका म्हणीचा अर्थ विचारण्यात आला होता. ‘देर आये दुरुस्त आए’, अशी ती म्हण होती. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, “ज्यांना यायचं होतं ते आलेच नाहीत आणि जे आले ते येणारच होते.” त्यांचे हे उत्तर ऐकून सर्वजण थक्क झाले. यावेळी त्यांचा बोलण्याचा रोख कोणाकडे होता, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

Team Global News Marathi: