“ज्याचं रक्त भगवं आहे, ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत”

 

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यात ‘निष्ठा यात्रे’ला सुरुवात केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते शिवसेनेच्या शाखा तसेच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांना भेट देणार आहेत. तर दुसरीकडे शिवसेना पक्ष आता संपला आहे. बाकीचे आमदारदेखील बंड करतील, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. विरोधकांच्या याच दाव्याला आदित्य ठाकरेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “ज्याचं रक्त भगवं आहे, ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे.

निष्ठा यारेदरम्यान, शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी, “आम्ही सगळीकडे फिरत आहोत. लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, ते जातील. पण मूळ नागरिक आहे, जो शिवसैनिक आहे. ज्यांचे रक्त भगवे आहे; ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत,” असे म्हटले आहे.

तसेच, ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला त्यांनी आम्हाला धोका दिला. कदाचित आमच्याकडून राजकारण कमी झाले असेल. समाजकारणात मात्र आम्ही कोठेही कमी पडलो नाही. ज्यांना परत शिवसेनेत यायचं असेल, त्यांना दरवाजे खुले आहेत. पण ज्यांना वाटतंय की तिकडे त्यांचं भलं होईल तर तिथेच थांबावं. ज्यांना दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीसाठी लोकांसमोर यावं. जनता जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य आहे, असेदेखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

Team Global News Marathi: