या लोकांना महत्व देण्याची गरज नाही, रोहित पवारांनी लगावला सदाभाऊ खोत यांना टोला

 

राज्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दौरे करू नये असे सुचविलेले असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चिपळूणचा दौरा केला होता याच मुद्द्यावरून रक्तक्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पवार कुटुंबियांना टोला लगावला होता. खोत यांच्या या टोलेबाजीला आता रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे.

सोशल मीडियावर ट्वीट करुन मोकळं व्हायचं. मात्र, प्रत्यक्ष कुठेही जायचं नाही. त्यामुळे या लोकांना महत्व देण्याचं कारण नाही. फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात झालेल्या भेटीवरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संकटकाळात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसही त्या भागात फिरत आहेत. माझीही या भागात देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती, असं रोहित पवार म्हणाले.

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत !

सातत्याने पवार कुटुंबात विसंगती दिसते. अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाही. पार्थ पवार ,सुप्रिया सुळे अस बोलताना कधी दिसले नाहीत. रोहीत पवारांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांचं ऐकलं पाहिजे. नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावे असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो. म्हणून रोहीतजींनी थोडं शिकून मगच पावलं टाकावीत असा माझा मैत्रीचा सल्ला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

Team Global News Marathi: