‘जनाब संजय राऊत ही तर भारतमातेसोबत गद्दारी’

 

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आज भल्या पहाटे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान मलिकांवर ईडीने चौकशी लावल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता या टिकेनानतंर आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

राणे म्हणाले की, जनाब संजय राऊत आमच्या मुंबईत १९९३ मध्ये झालेली साखळी बॉम्बस्फोटांची मालिका आपण सत्तेसाठी मुजरा करण्याच्या नादात विसरलेले दिसताहेत. या हल्ल्यात २५७ मुंबईकरांनी आपले प्राण गमावले होते आणि ७१३ मुंबईकर जबर जखमी झाले होते. या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये दाऊद इब्राहीम सहभागी होता. हे तुमचे काँग्रेस सरकार सत्तेत असतानाच सिद्ध झाले होते.

पुढे बोलताना राणे म्हणाले की, अशा देशद्रोह्यांसोबत भागिदारीचा आरोप नवाब मलिकांवर आहे. त्याचा सखोल तपास झाला पाहिजे, ही मागणी न करता तुम्ही मलिकांचा बचाव करण्यातच धन्यता मानत आहात. ही एक प्रकारची भारतमातेसोबत गद्दारी आहे. आता या पुढे आपण मुबंईला ‘आपली मुंबई’ म्हणू नका. कारण सत्तेसाठी आपण सगळं विसरलात, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

Team Global News Marathi: