नागपूर | हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस चांगलांच वादळी ठरला. कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. यावरून सत्ताधारी आणिविरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं. सीमावादाच्या प्रश्नानंतर पुन्हा एकदा जमीन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जमीन घोटाळा प्रकरणावर बोलताना विरोधी पक्षेनेते अजित पवार चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी या प्रकरणात आता थेट अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे. जमीन घोटाळ्यावर बोलताना अजित पवार चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी या प्रकरणात थेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सत्तार हे मागील सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील 37 एकर सरकारी जमीन वाटप करण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयाने ताशेरे ओढले असतांनाही भूखंड वाटप केल्याचा आरोप आहे. सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला भूखंड वाटप केल्याचा प्रकार जनहित याचिकेत उघड झाला आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. आता पवार यांनी सत्तार यांच्या राजीनाम्याच्या केलेल्या मागणीनंतर शिंदे ग काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे