Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवलं जाईल”

by Team Global News Marathi
April 25, 2023
in राजकारण
0
“जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवलं जाईल”

 

रत्नागिरीमध्ये बारसू येथे रिफायनरी विरोधात आंदोलन पेटले आहे. हजारो ग्रामस्थांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आंदोलन करणाऱ्या 25 महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.तसेच, आंदोलन करणाऱ्या महिलांवर सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलक तिथून हटले नाहीत तर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातील आणि जालियनवाला हत्याकांडाप्रमाणे बारसूमध्येही हत्याकांड घडवलं जाईल, अशी भीती यावेळी राऊतांनी व्यक्त केली.

संजय राऊत म्हणाले की, “बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. कालपासून सुमारे 5 ते 6 हजार लोक बारसूच्या माळरानावर जमले आहेत. आम्ही मरू गोळ्या खाऊ पण मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे पोलिसांना हाताशी धरून बारसूमधील रहिवाशांवर ज्याप्रकारे खारघरमध्ये सदोष मनुष्यवध केला, त्या प्रमाणे गोळ्या चालवू, अशा धमक्या दिल्या जात आहेत.”

“आज पाच हे सहा हजार कुटुंबं विरोध करण्यासाठी माळरानावर जमलेली आहेत. जे बारसूचे रहिवासी मुंबईत राहत आहेत आणि ज्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे त्यांच्या मुंबईतील घरांवर लाथा मारून पोलीस घरात घुसताहेत. त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. मुंबईतील बारसूवासियांना अटक केली जात आहे, “असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर अनेक गंभीर आओप केले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
भाजपकडून दीड लाख कोटींची लूट, प्रियंका गांधींचा मोठा आरोप

भाजपकडून दीड लाख कोटींची लूट, प्रियंका गांधींचा मोठा आरोप

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group