मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल १ मे रोजी औरंगाबद येथे सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे शरद पवारांवर पुन्हा जातीयवादाचे आरोप केले. इतर अनेक विषयांवरही भाष्य केले. शिवाजी महाराजांचा इतिहास, शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे सुरू झालेला जातीय द्वेष, मशिदीवरील भोंगे आणि इतर काही मुद्द्यांवर भाष्य केले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
“नास्तिक या विषयावर आपण फार बोलू नये, यावर आपल्याला जास्त माहिती नाही.सर्वात जास्त नास्तिक हे विनायक दामोदर सावरकर होते. कुठलाही पिक्चर रिलीज करण्या अगोदर त्याची काँट्रॅव्हर्सि कशी तयार करायची आणि पिक्चर सुपरहिट करायचा ? जेम्स लेन हा विषय कधीच सोडलेला आहे आणि बाबासाहेब पुरंदरे हे फिलॉसॉफर नव्हते. ते कादंबरीकार होते. ऐतिहासिक संदर्भ घेऊन ते कादंबरीकार होते.
महाराष्ट्रातील साहित्य संमेलन चा इतिहास बघा, साहित्य संमेलनामध्ये अनेक वेळा अध्यक्षपदी शरद पवार आणि उद्घाटक होते. मला आनंद आहे गेल्या 60 वर्षांमध्ये शरद पवार यांच्या व्यक्तीमत्वाच्या अवतीभवती राजकारण फिरत आहे. राज साहेबांचा जन्म होण्याआधी शरद पवारांचा राजकीय प्रवेश झाला. राजकीय प्रवेशानंतर त्यांच्या काकांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका केली. मात्र त्यांची मैत्री होती. पुतण्या आता राजकारणात खऱ्या अर्थाने आलेला आहे ती ही द्वेषापोटी आणि त्याच राजकारणात भीष्मपिता वरती टीका करणाऱ्यांवर हेडलाईन मिळवली जाते.” अशा शब्दात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर टीका केली.