चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल भाजपा प्रदेश कार्यलयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली होती. मात्र, काही तासातच होत नाही तोच राणे बॅकफूटवर गेले आहेत.
मंत्री नारायण राणे यांनी उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही. कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्या आमच्याकडून होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. नारायण राणे आज सपत्नीक चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी निघाले. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. आम्ही कोणतंही राजकारण करणार नाही. राजकारण केलं जाणार नाही. उद्घाटनाला कोणतंही गालबोट लागणार नाही हे आम्ही पाहू, असं राणे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकाच व्यासपिठावर येत आहात, याकडेही राणेंचं लक्ष वेधण्यात आलं. ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वर्षाने हा योग आला, असं राणे म्हणाले. पुन्हा हा योग येईल का? असा सवाल केला असता ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा, असं सांगून राणेंनी अधिक बोलण्यास नकार दिला.