उत्तर प्रदेश निवडणुकीला काही महिने शिल्लक राहिलेले असताना पुन्हा विजयाचा पताका रोवण्यासाठी भाजपने जदर तयारी केलीय आहे तर दुसरीकडे भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी सुद्धा मोर्चेबंदी सुरु केली आहे. त्यातच आता भाजपा, काँग्रेस, सपा, बसपा यांनी आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
सत्ताधारी भाजपासाठी उत्तर प्रदेश हे राज्य खूप महत्वाचे असल्याने त्यांना सत्ता टिकविणे राज्याच्या तसेच देशाच्या राजकारणासाठी फायद्याचे आहे. कारण लोकसभेच्या सर्वाधिक जागा या उ. प्रदेशमध्येच आहेत. यामुळे भाजपाने निषाद पार्टी आणि अपना दलासोबत आघाडी केली असून दोन्ही पक्षांना योग्य पद्धतीने जागा देण्यात येतील अशी घोषणा आज करण्यात आली आहे.
आज भाजपाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रभारी धर्मेंद्र प्रधान, प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव आणि निषाद पार्टीचे संजय निषाद हे उपस्थत होते. भाजपात निषाद पार्टीचे विलिनीवरण करणार नसल्याचे निषाद यांनी सांगितले. तसेच निषाद पार्टी आपल्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचेही ते म्हणाले.