सभागृहात घातलेला गोंधळ भाजपा नेत्यांना भोवला, १२ आमदारांना एका वर्षासाठी करण्यात आले निलंबित

 

मुंबई | राज्यात मराठा आरक्षण आणि ओबेसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चांगलेच आघाडी सरकारला सभागृहात घेरले होते. त्यातच या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली असून ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे अखेर भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबित करण्यात आले आहे.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं की, भाजपच्या आमदारांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर संसदीय मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला आणि १२ आमदार निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.

यात संजय कुटे, आशिष शेलार, हरीश पिंपळे, योगेश सागर , गिरीश महाजन,पराग आळवणी, अभिमन्यू पवार, अतुल भातखलकर, नारायण कुचे आणि बंटी बंगडीया या आमदारांचा समावेश आहे. हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर फडणवीस यांनी हा लोकशाहीचा अपमान आहे म्हणत सभागृहाच्या कामावर बहिष्कार घातला.

राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडला. पण, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. एवढंच नाहीतर सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की सुद्धा केल्याची माहिती समोर आली आहे.

Team Global News Marathi: