भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जातंय, सर्वाधिक छळ गोपीनाथ मुंडेंचा झाला – एकनाथ खडसे

भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपात OBC नेत्यांना दाबले जाते असा पुन्हा एकदा त्यांनी आरोप भाजपा नेत्यांवर लगावला आहे. ‘मागील काळात ओबीसी नेत्यांना भाजपनं नेहमीच सहकार्य केल्याचं पाहायला मिळत होतं. पण गेल्या काही वर्षात भाजपमध्ये ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात केलं जात असल्याचा आरोप खडसेंनी पुन्हा एकदा केला आहे.

खडसे म्हणाले की, गेल्या ४-५ वर्षांचा विचार केला तर भाजपचे काही नेते ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वात जास्त गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला,’ असा आरोपही खडसे यांनी केला आहे.खडसेंनी भाजपवर केलेल्या या गंभीर आरोपांमुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

अद्याप तरी भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून खडसेंनी केलेल्या या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. परंतु यावर आता भाजप कोणती भूमिका घेत आहे हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: