उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी 196 रुग्णांची वाढ ; आठ जणांचा मृत्यू

उस्मानाबाद, दि. 30 : उस्मानाबाद जिल्हयात आज बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 196 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 182 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 12 हजार 172 झाली आहे. यातील 9 हजार 384 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 375 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2 हजार 413 जणांवर उपचार सुरु आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: