एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात, सेनेचा कंगनाला टोला

 

मुंबई | सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारी कंगना रानौत हिने थेट भारताच्या स्वातंत्र्यावर विधान करून नवा वाद अंगावर ओढावून घेतला होता. त्यांच्या या विधानामुळे तिच्यावर सर्व स्थरातून टीका होताना दिसून येत होती. भारताला १९४७ ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर २०१४ ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रानौत’ने केले होते.

दरम्यान, कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातुन जोरदार टीका करत समाचार घेण्यात आला आहे. एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात असं एकदा टिळक म्हणाले होते, कंगना रानौतला हे वक्तव्य तंतोतंत लागू पडते, अशी खोचक टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचा इतका भयंकर अपमान कधीच कोणी केला नव्हता. कंगनाने भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळ्यांवरच अफू-गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे. या वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाला सर्वोच्च अशा नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे.

कंगनाबेन यांनी यापूर्वी महात्मा गांधींचाही अपमान केला आहे. तिचं नथुरामप्रेमही उफाळून येत असतं. तिच्या बरळण्याकडे एरवी कुणी फारसं लक्ष देत नाही. एक आण्याची भांग घेतली, तर भरपूर कल्पना सुचतात, असं एकदा टिळक म्हणाले होते. कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं ठरतं’, अशा शब्दांत शिवसेनेकडून कंगना रनौतवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे

Team Global News Marathi: