राज्यात मुसळधार पावसाघरात- दुकान पाणी शिरलेल्या पूरग्रस्त नागरिकांसाना ठाकरे सरकारकडून इतक्या हजाराची मदत !मुळे पंचम महाराष्ट्रासह कोकणात अनेक ठिकाणी पुरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पुराच्या पाण्यात अनेकांचा सासरा वाहीन गेला आते तर अनेक व्यापारी वर्गाचा लाखो रुपयाचा माळ पाण्यामुळे खराब झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे.
ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरलं त्यांना १० हजार रुपयांची तातडीची मदत दिली जाणार आहे तर अन्नधान्य खरेदीसाठी ५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा राज्य सरकारमधील मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच ज्यांचा मृत्यू झाला असेल, त्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी घोषित केली आहे.
यातील एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून आणि चार लाख रुपये एसडीआरएफमधून असे पाच लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडून संबंधित कुटंबास दिले जाणार असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे. पुराने बाधित झालेल्या कुटुंबांना १० किलो तांदूळ, १० किलो गहू, ५ किलो तूरडाळ, ५ लिटर केरोसीन मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे.