‘हिंदू ह्रदयसम्राटांचे बेटे उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये साधुवर हल्ला झाल्यावर सीबीआय ला तपास करण्यास नकार दिला. तीन पक्षाचे सरकार असताना उद्धव ठाकरे आधी काँग्रेसला माथा टेकवत होता, आता अखेर पूर्णच झुकले आहे’, असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी टिका केली. भाजपने मिशन १४४’ ची घोषणा केली आहे. या मिशनची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज पासून चंद्रपुरातून केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली.
मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारला मागे टाकत काँग्रेस सोबत आघाडी केली. मोदी स्टेजवर असताना केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्रचे नारे लागत असताना शांत होते.मात्र निकाल समोर येताच मनात लाडू फुटले आणि विचार धारेला मागे टाकलं. ज्यांनी भारताच्या संस्कृतीला समजण्यास नकार दिला त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवलं, अशी टीका नड्डांनी ठाकरेंवर केली.
पुढे टीकाकारांना नड्डा म्हणाले की, तीन पक्षाची सरकार असताना उद्धव ठाकरे आधी काँग्रेसला माथा टेकवत मग काँग्रेसला माथा टेकवत आणि अखेर पूर्णच झुकले आहे, असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी टीका केली.’महाविकास आघाडी सरकारमध्ये दलाली आणि कमिशन खोरी केली महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी युती सरकारला संधी द्या. भाजप आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. भाजपच्या विजयाची सुरुवात चंद्रपूर पासून होईल’, असं आश्वासनही नड्डांनी दिलं. ‘जग संकटात असताना भारत मात्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रगती करत आहे’, असंही नड्डा म्हणाले