मुंबई | महाराष्ट्र सरकारने नियम आखून परवानगी दिली स्वागत… अन् नाही दिली तरी आम्ही श्री कृष्ण जन्माचा सोहळा दहीहंडी करणारच . हिंदू धर्माचे सण आम्ही साजरे करणारच . स्वतः घरात बसुन हिंदूनी काय करावे अन करू नये या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. असं म्हणत भाजपा आमदार राम कदम यांनी आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संकट अद्याप टळले नसल्याने राज्यात दहीहंडी उत्सवाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपनेते राम कदम यांनी ठाकरे सरकारवर यापूर्वी कडाडून टीका केली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
ते म्हणाले होते की, काहीतरी नियम घालून द्या, पण उत्सव सरसकट रद्द करु नका, असं राम कदम यांनी म्हटलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्हाला नियमांबद्दल काहीच म्हणायचं नाही. आम्ही नियम पाळायला तयार आहोत. मात्र प्रत्येकवेळी संयमाची सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का सांगायची ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
महाराष्ट्र सरकार ने नियम आखून परवानगी दिली स्वागत… अन नाही दिली तरी आम्ही श्री कृष्ण जन्माचा सोहळा #दहीहंडी करणारच . हिंदू धर्माचे सण आम्ही साजरे करणारच . स्वतः घरात बसुन हिंदूनी काय करावे अन करू नये या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) August 28, 2021