राज्यसभेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीन आणि भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला तर सांज राऊतांना विजयची चव चाखायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले. भाजपच्या पियूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला.
एकीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपचा फार मोठा विजय म्हणण्याचे कारण नाही. ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या गर्व हरणाला पुरेशी ठरणार असल्याचे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी सोडले आहे.
अखेर रडीचा डाव यशस्वी झाला. अपक्षातील काही मतदारांवर यंत्रणा, धाकदपट शाहिने कपटी राजकारण करण्यात भाजप यशस्वी झाली असली तरीही त्यांनी एक लक्षात ठेवावे, मविआची मत सुरक्षित आहेत. त्यात फुट नाही. तुमच्या केंद्रीय यंत्रणा तुमच्या कामी आल्या. २०२४ ला हा हिशेब चुकता करु, असे अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तसेच शिवसेनेच्या संजय पवारांना पहिल्या फेरीत सर्वात जास्त पसंदीची मते आहेत. त्यामुळे भाजपचा फार मोठा विजय म्हणण्याचे कारण नाही. काही अपक्षाच्या जोरावर दगा फटका करणारी ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या गर्व हरणाला पुरेशी ठरणार, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी हल्लाबोल केला.